Mukhyamantri Annapurna Yojana महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मोठी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारने महिलांना मोठा दिलासा देत, लाखो महिलांना वर्षभरात ३ मोफत LPG गॅस सिलेंडर मिळणार आहेत. या योजनेंतर्गत राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना गॅस सिलेंडरवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित इंधन उपलब्ध करून देणे, तसेच महिलांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा करून त्यांना सशक्त बनवणे या उद्देशाने केंद्र सरकारने २०१६ साली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhanmantri Ujjwala Yojana) सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी दिली जात आहे. तथापि, काही गरीब कुटुंबांना बाजारभावाने सिलेंडरची पुनः भरावणी करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही. यामुळे अनेकदा, एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर मिळेपर्यंत पर्यावरणाची हानी होईल असा पर्याय अवलंबण्याची वेळ येते, जसे की वृक्षतोड करणे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी वर्षभरात ३ मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) : आर्थिक मदतीचा विस्तार
महाराष्ट्र सरकारने नुकतीच चालू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि सामाजिक योजना दर महिन्याला गरीब महिलांना १५०० रुपये देणार आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. आता या योजनेत आणखी एक महत्वाचा विस्तार करण्यात आला आहे ज्यामुळे महिलांना वर्षभरात ३ मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. सरकार लवकरच या योजनेची अमंलबजावणी करणार आहे आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाद्वारे आवश्यक आदेश जारी केले आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Yojana) लाभार्थी आणि अयोग्यतेचे निकष
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत गॅस कनेक्शन ज्यांच्या नावावर आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे. याशिवाय, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ कुटुंबातील एका सदस्याला मिळेल. राज्य सरकार लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल. ही रक्कम केंद्र सरकारच्या ३०० रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त असेल.
लाभ कोणाला मिळणार नाही?
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा लाभ १ जुलै २०२४ नंतर जारी झालेल्या शिधापत्रिकाधारकांना मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
उज्ज्वला योजना (Pradhanmantri Ujjwala Yojana): लाभार्थ्यांना आठ महिने अनुदान
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhanmantri Ujjwala Yojana) अंतर्गत गरीब महिलांना ३०० रुपयांचे अनुदान पुढील आठ महिने, म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ साली सुरु झाली होती. आतापर्यंत देशभरातील ९ कोटींहून अधिक महिला या योजनेत सामील झाल्या आहेत आणि त्यांना प्रति सिलेंडर ३०० रुपये अनुदानाचा लाभ मिळत आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फायदे
आर्थिक मदत: गरीब महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत होईल.
उर्जा सुरक्षा: मोफत LPG सिलेंडरमुळे महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित उर्जेचा वापर करण्यास मदत मिळेल.
सामाजिक उन्नती: आर्थिक स्थैर्यामुळे महिलांचे सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधता येईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक योजनांमुळे गरीब महिलांना मोठा लाभ मिळणार आहे. या योजनांमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या प्रयत्नामुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. या योजनांची यशस्वी अमलात आणणी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
Also Read- IC 814 the kandahar hijack वेब सिरीज करा download